Posts

Showing posts from May, 2024

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत कूर्मावतार

Image
  तेणेंचिं कमठावतारा । स्वपृष्ठीं धरुनि गिरिवरा ।  मंथोनियां क्षीरसागरा । अमृत सुरवरां अर्पिले ॥   - श्रीनाथभागवत, ४:२१७.  विश्वाचा आदिकारण जो परमेश्वर त्याच्यापाशी द्वैतभाव नावाची वस्तुच नसल्याने अमुकांना तारणार आणि तमुकांचा नाश करणार, एकाचे रक्षण दुसर्‍याचा वध असा पक्षपातीपणा नाहीं. कारण तोच जर सगळ्यांचा (६९) प्रजापती  आहे तर दुजाभाव कसा ठेवेल ! तथापि जसा तो उत्पत्तीकारक नि पालक आहे तसाच लयाचाही अधिपती आहेच. सूक्ष्मातून स्थूलांत संक्रमण झालें की सत्त्व-रज- तम या गुणांचा अंतर्भाव होऊन उपाधीव्याप्त होतो. म्हणूनच 'संभवामि युगे युगे' हे त्याचे वचन दुष्टांच्या विनाशाकरीता आणि सुष्टांच्या रक्षणार्थ असल्याने पुन्हा पुन्हा अवतार धारण करून आणि तेही निरनिराळ्या स्वरुपांत घ्यावा लागतो. यास्तवच भगवंत सगळ्या मोजमापाच्या पलीकडे असा (१०२) अमेयात्मा असून साकार प्रकट होणारा (३०५) व्यक्तरुपः असाही आहे.  देवदानवांच्या युद्धांत दैत्यांचे वाढत्या बळामुळें देवांपुढे मोठा पेचप्रसंग उभा राहिला. निस्तेज झालेल्या देवांना संजीवनी मिळेल असा ठोस उपाय हाती असणें आवश्यक होते आणि ते...

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीनृसिंहावतार

Image
     भक्त प्रल्हादाकारणें नरसिंह झाला । विदारुनि दैत्य स्तंभी उद्भव केला॥ - श्रीएकनाथ महाराज . सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत कुठल्या स्वरुपांत येऊन सहाय्य करतील, ते एक परमेश्वरच जाणे. तो उत्पत्तिकारण (६) भूतकृत्  आहे, पालनकर्ता म्हणून (३३) भर्ता नि संहारक (५५९) भगहा असल्याने प्रत्येक प्राणीमात्रांच्या जीवनाची दोरी त्याच्या हाती आहे. पौराणिक इतिहासावरुन प्रत्येक अवतारामागे कारणमीमांसेची पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते. कारणाशिवाय परमेश्वराने एकही गोष्ट निर्माण केलेंली नाहीं. अवतरीत होण्याचे कारण उपद्रवमूल्य हा घटक महत्त्वाचा आहे. स्वामी वरदानंद भारती नेहमी म्हणत की परमात्मा ज्ञानदेव- तुकोबांसारख्या महात्म्यांना मुक्ती देण्यास येतो किंवा कंस- रावणासारख्यांच्या संहाराकरीता. त्यातही आपल्याकडे कंसवध, रावणवध या संज्ञापेक्षा कंसोद्धार, रावणोद्धार असें म्हटले आहे . कारण त्या त्या जीवांची शापापासून झालेंली मुक्ती ही होय, म्हणूनच त्यास (१२) मुक्तानां परमा गतिः असें श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रामध्यें म्हटले आहे.  श्रीविष्णूंचे द्वारपाल जय आणि विजय यांनी ब्रह्मदेवाचे मानसपु...

श्रीविष्णुसहस्रनामांतर्गत श्रीमोहिनी अवतार

Image
     भक्ताचिया रक्षणा। नारी झालास नारायणा।     राहू-केतू सुधापाना। करूं पाहती देवांसह ॥ तेव्हां धरुनी अवतार। वधिला त्वां दुष्टासुरा।    तुला माझा नमस्कार। वारंवार असो हा॥                          - श्रीदासगणुमहाराजकृत श्रीमोहिनीराज स्तोत्र   श्रीमद्भागवतामध्यें समुद्रमंथनाची कथा मोठ्या अद्भुत तथा भगवंताच्या रसपूर्ण लीलेने वर्णिली आहे. त्या एका कथेमध्यें परमेश्वराचे कूर्म, धन्वंतरी आणि मोहिनी हे प्रत्यक्ष अवतार, तसेंच रज्जू झालेला वासुकी सर्प, मंथनोद्भव ऐरावत, उच्चैश्रवादी भूतमात्रांत अंशाशंत्मरित्या भगवंत प्रविष्ट झालें. सगळ्या वस्तूंत जो व्यापून रहातो म्हणून त्यास (४६७) व्यापिन्  असें म्हटले गेलें. समुद्रमंथनाचा मूळ उद्देश सत्त्वगुणांच्या वृद्धीसाठी होता हे कथारंभी देवादिकांनी श्रीविष्णुला केलेंल्या प्रार्थनेवरुन दिसतो. त्यातील भागवत पुराणात श्रीहरीने देवांना केलेंल्या उपदेशात मला भावलेलें दोन श्लोक मुद्दाम उधृत करतो ;  यत दानवदैतेयैस्तावत् सन्धिर्विधीयताम् । कालेनुगृहीतै...

श्रीविष्णुसहस्रनाम आणि अक्षय्यतृतीया

Image
                      अक्षयीं तें झालें । आतां न मोडे रचिले।।                                                                - श्रीतुकाराममहाराज { जी अक्षय गोष्ट मिळविण्यासाठी अट्टाहास केला ते रचलेलें केव्हाहीं मोडू नये.} भगवान् श्रीकृष्ण आपल्या विभूतीतत्त्वांचा निर्देश करताना अर्जुनास अहमेवाक्षयः कालः अर्थात क्षय न झालेला काळ मी आहे असें म्हणाले. हा काळ केव्हा निर्माण झाला, वा भासमान झाला; तर जेव्हा मूळमाया (शक्ती) अष्टधाप्रकृती ब्रह्मापासून विस्तार पावून सृष्टी क्रमाक्रमाने आकारास आली तेव्हा. त्याविषयीं श्रीसमर्थ दासबोधात काळरूपनिरूपणांत म्हणतात, मूळमाया जगदीश्वर। पुढे अष्टधेचा विस्तार। सृष्टीक्रमें आकार। आकारला॥ हे अवघेंच नसतां निर्मळ। जैसे गगन अंतराळ। निराकारीं काळवेळ। काहींच नाहीं॥ उपाधीचा विस्तार जाला। येथे काळा दिसोन आला। येरवी पाहातां काळाला। ठावची नाहीं॥  ...