Posts

Showing posts from December, 2021

सोपान आनंदें समाधि बैसला

Image
  श्रीसोपानदेव महाराज सप्तशतकोत्तर रोप्य समाधी उत्सव महाराष्ट्रामध्यें भागवतधर्माचे पिक जर कुणी रुजविले असेल तर ते निःसंशय एकाच घराण्यात जन्माला आलेल्या चार दिव्य विभूतींनी होय.त्यांची नांवे निदान मराठी जनांना माहित नसेल असें होणे शक्य नाहीं. श्रीनिवृत्तीनाथ, श्रीज्ञानदेव, श्रीसोपानदेव आणि श्रीमुक्ताई.एक सुभाषित आहे की  दुर्लभं भारते जन्म मानुष्यं तत्र दुर्लभम्।  म्हणजे, भारतात जन्माला येणे हे दुर्लभ आहे, परंतु त्याहून दुस्तर तेथे माणूस म्हणून जन्मणे. त्याच चालीवर मला म्हणावेसे वाटते, दुर्लभं भारते जन्म महाराष्ट्रेऽतिदुर्लभम्। . की, महाराष्ट्रात जन्माला येणे त्याहून दुस्तर होय.यामध्यें रव्याच्या कणाएवढाही प्रांतवाद नसून नितांत अभिमानची आणि माझ्या पूर्वसुकृताची जोड आहे. आपण कुठे, कुणाच्या पोटी, कसल्या परिस्थितीत जन्माला यावे हे काहीं आपल्या हाती नाहीं.पण जिथे आलो त्या समाजाचे ऋण आपल्या शिरावर आहे नि अंशतः ते फेडायचेही आहे याची जाणीव महत्त्वाची.अशा या संतांनी, सत्पुरुषांनी पावन केलेल्या महाराष्ट्रात आपण जन्माला यावे हा बहुमान मिळण्यासारखे होय! असो. किती अपूर्व गोष्ट आहे आ...

नाशिकमधील ते चोवीस तास

Image
मला अजून आश्चर्य वाटत आहे की ह्या सगळ्या तुझ्या फेसबुकवर झालेल्या ओळखी आहेत! कमाल आहे !! किती आपुलकीने भेटले सगळे आणि वागण्यातही अकृत्रिमता!!! माझी ही त्र्यंबक-नाशिकची ट्रिप अविस्मरणीय झाली.बरं झालं आपण अलिबागला गेलो नाहीं.इथे जो आनंद लुटला त्याची सर तिथे आली नसती. खरंच थँक्स अनिकेत.अगं, मला का थँक्स? ती माणसचं मुळात चांगली म्हणून आपल्याला हा अनुभव आला. थँक्स त्यांना दिल्या पाहिजेत. शनिवारी सकाळी आम्हा दोघांची टेलिपॅथी इतकी जुळली त्याला तोडच नाहीं.रमा ऑफिसला गेली आणि सहज विचार आला, तेरा तारखेला लग्नाचा वाढदिवस आहे तर कुठेतरी दोन दिवस जाऊन येऊ.त्र्यंबकेश्वरला जायचे अनेक दिवस मनात होतं.पण योग्य काही जुळत नव्हता.सकाळी अकराला वगैरे आदित्यला फोन  केला आणि म्हटलं नाशिकला यायचा प्लॅन करतोय.कसं येणं सोईचे पडेल वगैरे चर्चा केलीं आणि ठरवले त्र्यंबकला जायचे.हिला फोन केला. "ऑफिसहून लवकर निघत येईल का? नाशिकला जाऊया.त्र्यंबकेश्वरला. म्हणाली, "अरे काय गम्मत आहे, आज सकाळीच माझ्या मनात आलेलं की त्र्यंबकला जाऊया म्हणून! आणि तू तेच ठरवतोयस्!!" बास मग,आता जाऊच. फोनवरूनच मला रमाचा आनंदित झा...

भक्तवत्सल श्रीदत्तात्रेय

Image
      ☆ भक्ताभीष्टप्रदं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ☆ सगुण - निर्गुण, मंत्र - यंत्र - तंत्र, पूजन - जप - पारायण, योग - याग, किंवा केवळ स्मरणमात्रेने अश्या नानाविध मार्गाने ज्या एका देवतेची उपासना करून त्याची पूर्ण कृपा प्राप्त होते तो भगवान् श्रीदत्तात्रेय. या देवतेठायी गुरुत्त्व - दैवत्व आणि परतत्त्व यांचा त्रिवेणी संगम होऊन भक्ताचे ध्येय आणि ध्याता एकाच रूपाने नांदत आहे तो   गुरुदेव दत्त  होय.   पुराणांमध्ये आणि सत्पुरुषांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथात दत्तप्रभूंच्या महात्म्याचे साद्यन्त वर्णन करूनही या देवतेबद्दल अगम्य रहस्य सदैव अद्भुत नि विस्मयकारक ठरली आहे.त्याचा अनुभव आजही जनसामान्यांना येतो. सहसा तर्काने न पटणाऱ्या किंवा बुद्धीच्या पलीकडे एका अनाकलनीय शक्तीच्या सामर्थ्याचे श्रेष्ठत्व तथाकथित 'चार बुकं' शिकलेले जीव मान्य करीत नाहींत.त्याचे कारण केवळ आपल्याकडे कमीपणा येईल अशी भीती असते.स्वामी वरदानंद भारती अशांना एक प्रश्न नेहमी करीत की, पृथ्वीचा जर ताशी एक सहस्र मैल फिरून त्याचा "प्रत्यक्ष अनुभव" कोणासही येत नसेल तर तो गणिताने मांडलेला तर्क खो...

श्रीमद्भगवद्गीता जयंती

Image
   ☆  श्रीमद्भगवद्गीता जयंती  ☆        सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः।     पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत॥ सर्व उपनिषदें ह्या गाई,श्रीकृष्ण हाच त्यांचें दूध काढणारा,बुद्धिमान अर्जुन हा तें दूध पिणारा वासरूं आणि गीतारूपी अमृत हें त्या गीईचें दूध होय. सुबुद्ध वाचक हा त्या गीतारूपी अमृताचा भोक्ता होय. हा गीतामहात्म्यचा प्रसिद्ध श्लोक बहुतांश भाविकांनी परिचयाचा असेल. प.पू.स्वामी वरदानंद भारती यांना घरात रथारूढ कृष्णार्जुनाचे चित्र लावावे की नाहीं  असा प्रश्न केला होता. स्वामींनी क्षणार्धात उत्तर अधोरेखित करून अवश्य लावावें   याची द्विरुक्ती केलीं.नि त्याचे कारण सांगताना म्हणाले "श्रीकृष्ण आणि अर्जुन एकत्र असणे हे स्वतःचे भाग्य उदयाला आणण्याचे पहिलें साधन आहे." आणि त्याचा गीतेमध्येंच निर्वाळा दिला तो - यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मातिर्मम॥  (१८:७८) जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण व जिकडे धनुर्धर अर्जुन तिकडेच श्री, विजय, शाश्वत ऐश्वर्य व नीति, असें माझें ...

श्रीज्ञानोबांचा सप्तशतकोत्तर रौप्य संजीवन समाधी दिवस

Image
    मी आधींचि कांहीं नेणें। वरी कवळिलों  मोहें येणें। हे महारावो! हे सद्गुरो! ज्ञानराया, अलौकिकरित्या तुम्ही जनांच्या दृष्टी आड होऊन सव्वा सातशे वर्षे झाली.तथापि आपण "अक्षर" वाङ्मयाद्वारें निर्मिलेल्या सुलभ भक्तीमार्गात केव्हांही खंड न पडता उत्तरोतर वाढीस लागला नि ते "इवलेसे रोप" जे तुम्ही भक्तांच्या हृदयांत लावले तो "वेल" बहरून त्याचा भला मोठा वृक्ष होऊन त्याच्या शितल छायेत असंख्य श्रांत मुमुक्षूंनी, साधकांनी आपले कोट कल्याण करुन घेतले, आजही करून घेत आहेत. "माऊली माऊली" चा महाघोष करीत वेडावून जाणारा, उत्कट प्रेमाचा उमाळा येऊन अश्रुधारांनी समाधीवर अभिषेक करणारा भाविक, त्यात तो कितीही विद्वान असो वा सामान्य हा भेदच नुरता चरणांशी घट्ट मिठी घालतो; ही कुठली अतर्क्य शक्ती त्याला करावयास लावते! याचे कोडे न सोडविलेंलेच बरे!! तुमचे नाम उच्चारता वा अदृष्य स्वरुपांतली मुर्ती डोळ्यासमोर धरता काळजात भावनांचा जो कल्लोळ उसळतो त्याला शब्दांत काय मांडणार!!! जे होते ते विलक्षण हे मात्र खरें. केवळ बावीस वर्षात आपण निर्माण केलेंले महत्कार्य मी चार थोटक्या शब्दां...