Posts

Showing posts from August, 2022

तां वन्दे श्रीभारती संस्कृतिम्

Image
  या वेदोपनिषत्स्वनादिसमयाद्मूलं बिभर्ति स्वकम्। या रामायणभारतादिषुहिता प्राज्ञैः समाख्यापिता॥ या वै व्यष्टिसमष्टि मड्ग़लकरी संपूर्णता बोधिनी। तां वन्दे विनयेन तत्परतया श्रीभारती संस्कृतिम्॥                                           - स्वामी वरदानंद भारती. ज्या संस्कृतीची मूळे अनादीकालापासून वेद, उपनिषदादिंमध्यें रुजलेली आहेत, ज्या संस्कृतीचा हितकार विचार आणि वैशिष्ट्ये रामायण, महाभारतादी प्राचीन ग्रंथातून थोर बुद्धिमंतांनी प्रकट केला, जी संस्कृती व्यष्टि म्हणजे व्यक्ती आणि समष्टि म्हणजे सर्व समाजाचे कल्याण साधून देणारी आहे, जी सर्व दृष्टीने संपूर्णतेचा बोध करून देते, त्या ऐश्वर्ययुक्त भारतीय संस्कृतीला तत्परतेने मी विनयपूर्वक वंदन करतो. हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव  संपूर्ण देशामध्यें मोठ्या दिमाख्यात साजरा होत आहे.पंचाहत्तर वर्षांपूर्वी पारतंत्र्याच्या शृंखला निखळून आनंदवनभुवन  निर्माण झाले.ह्यामागे अगणित देशभक्तांनी रक्ताचे पाणी करून, घरावर...

गाथा बलिदानाची

Image
  तुजसाठी मरण ते ज तुजवीण जनन ते मरण तुज सकल चराचर शरण श्रीस्वतंत्रते भगवती॥                                                       - स्वातंत्र्यवीर सावरकर मातृभूमीसाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांची यादी करावयाची झाली तर खरोखरी अथपासून इतिपर्यंत प्रामाणिकपणे सगळ्या देशभक्तांची नांवे सापडतील काय? कठीण आहे.कारण या क्रांतिकार्यास अप्रत्यक्षपणे साह्य करणारेही प्रत्यक्ष सहभागी होणाऱ्याइतकेच स्वार्थ त्यागून स्वदेशाकरीता झुंजले.स्वातंत्र्यवीर सावरकरांचे या समरात शौर्याच्या पराकाष्ठेविषयीं म्हणतात "कोण मेला आणि कोण जगला ह्या रणघाईतील योगायोगावरून हुतात्म्यांची नि वीरात्म्यांची योग्यता ठरत नाहीं.तर ती सत्समरात देहपतन होईतो किंवा विजय मिळेतो कोण लढत राहिला ह्यावरून ठरते." इंग्रजींविरूद्ध भारतीयांनी केलेल्या स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास असाच आहे.स्वातंत्र्याचे रण माजले असता या यज्ञामध्यें रक्ताचा हविर्भाग पडल्याखेरिज तो यज्ञकुंड शांत होत नसतो हे त्रिकाला...