Posts

Showing posts from November, 2021

श्रीशिव-विष्णुसहस्रनाम अर्थात हरिहर ऐक्य

Image
  श्रीमन्महाभारतांतर्गत      " शिवसहस्रनाम आणि विष्णुसहस्रनाम"    अर्थात   ☆  हरि - हार ऐक्य  ☆ अग्राह्यमचलं शुद्ध बुद्धिग्राह्यं मनोमयम् । {महाभारत}   आपल्या हिंदुधर्म संस्कृतीमध्यें अनंत देवता आणि त्यांचा असंख्य पूजा पद्धती रूढ आहेत.पूजनासमवेत स्तोत्रांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे नि धार्मिक वाङ्मयांतला अत्यंत लोकप्रिय स्तवन प्रकार आहे.त्यामध्यें वेदसुक्तापासून ते प्राचीन-अर्वाचीन संत- महापुरुषांनी केलेंल्या रचनांचा एकत्र समावेश करायचा म्हटला तर लक्षावधी पाने खर्ची होतील. सहस्रनाम हें नामावली प्रकारचे स्तोत्र आहे.सहस्रनामाचे प्रजोजन असें कीं,त्या त्या देवतेप्रति भक्तांच्या मनांत अतीव श्रद्धा, निष्ठा , प्रेम आणि भक्ती अधिकाधिक दृढ व्हावी हे होय. खरंतर प्रत्येक अक्षर, व्यंजन, स्वर, छंद, शब्द, वाणी हें ईश्वराचेच प्रतीक आहे.त्यास अक्षरब्रह्म म्हणा वा शब्दब्रह्म किंवा नादब्रह्म.त्या भगवंताचे गुणमहात्म्य वर्णन करून ऋषी, आचार्य, संतादी थोर सत्पुरुषांनी सामान्य जनांना सदैव ऋणी केलें आहे. महाभारतकाळापासून देवाधिदेव श्रीशंकर आणि पुरुषो...

श्रीविष्णुसहस्रनाम आणि दिवाळी, भाग:२

Image
  तैसे सकळ पुरुषार्थ। जेणें  स्वामी कां सनाथ।                  तो कृष्णरावो जेथ। तेथ लक्ष्मी॥ - श्रीज्ञानेश्वरी {१८:१६३८} धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ ज्याच्या अधिष्ठानावर  (ना.क्र ३२४) सनाथ किंवा सनात् (८९३) म्हणजे चिरकालीन टिकणारे तो भगवान् श्रीकृष्ण जेथें असणार तेथें सर्वकामद (८५१) सकल इच्छा पुरविणाऱ्या परमात्म्याची महाशक्ति (१७५) ही  लक्ष्मी (९४३) असावयाची.       "दिवाळी आणि समुद्रमंथन" या  पौराणिक कथेचा फार जवळचा संबंध मला आढळतो.नि या रत्नांचे प्रतिकात्म पूजन,व्रत आपण दिवाळीच्या पर्वकाळात करतो. राज-तम वृत्तीच्या अपार परिश्रमातून "लक्ष्मी"ची उत्पत्ती झाली नि तिचा विनियोग सात्विकतेच्या वेदीवर करणें हाच या मंथनाचा गर्भितार्थ भासतो. अशा लक्ष्मीचा विष्णुसहस्त्रनाम सहज अंतर्भाव करून ब्रह्म आणि मायेचे एकमेकास पूरक नाते प्रस्थापित केलें आहे. आणि म्हणून निवडक नामांना वेगळें काढून "शिव-शक्तिचे" निराळेपण दाखवणें अत्यंत कठीणच नव्हे तर अशक्यप्राय काम होय. संपूर्ण सहस्रनाम परमेश्वराच्या परमद...

श्रीविष्णुसहस्रनाम आणि दिवाळी, भागः१

Image
🪔 भांडवल माझें मिरविसी जनीं । सहस्रवोवणी नाममाळा ॥ 🪔                                                                 - श्रीतुकाराम महाराज भगवान् श्रीकृष्णाने अर्जुनास आपले रहस्यमय विश्वरुपदर्शन प्रकट करते वेळी गीतेमध्यें वक्ष्यामि हितकाम्यया   (१०:१) अशी प्रारंभी ग्वाही देत हे माझे विराट स्वरुप कसें हितकारक नि सर्व पापैः प्रमुच्यते असें असून, माझा भक्त समस्त पातकांपासून मुक्त होऊन जातो. असें आश्वस्त करतात. त्याच प्रकारची प्रस्तावना विष्णुसहस्रनामाचा उपदेश करताना भीष्माचार्यांनी राजा युधिष्ठीरांस निवेदिली. विष्णोर्नामसहस्रं मे श्रृणु पापभयापहम्। - पापांचे भय दूर करणारे सहस्रनाम माझ्याकडून ऐक, अशी सहस्रनामाची सुरुवात झाली आहे. पापरहित, कल्याणकारक गोष्टी कोणती असा जर सामान्य मनुष्यासाठी विचार केला तर ऐहिक सुख हीं पहिली पायरी आहे.त्यात सण- उत्सव हे सांसारीक जीवनातले स्व तसेच जनहिताचे अनमोल क्षण मानावयास कां नको! कारण त्यामध्...