Posts

Showing posts from July, 2021

आठवण बाबूजींची

Image
  शिवाजी पार्कचे शंकर निवास.जात येता अनेकदा पहात नि मनांत विचार येई कधी या असामान्य व्यक्तिमत्वाची भेट होईल का! एके दिवशी ते धाडस करून जिने चढून वर गेलो.दारावरची सुधीर फडके  अशी सुबक पद्धतीने रंगवलेली पाटी वाचून काहीं क्षण बेल वाजवण्याचा धीर होत नव्हता.मनाचा हिय्या करून बेल वाजवली. बाबूजींच्या पत्नी सौ.ललिताबाई फडके उर्फ माई यांनी दार उघडून विचारणा केली, कोण आपण, काय काम? माझं वय सोळा आणि थेट अहो-जाहो! मी ओशाळलोच.काम.. म्हटलं मी अनिकेत घिवलीकर,शिवाजी पार्कलाच रहतो,मला बाबूजींना भेटायचे आहे. बरं म्हणाल्या. पण बाबूजी घरी नाहींत तासा- दीड तासाने येतील तेव्हा या.मी नमस्कार करून परत घर आलो.पण आज निश्चयच केलेला बाबूजींना भेटायचे. संध्याकाळी पुन्हा गेलो.बाबूजी अजून आले नव्हते.पण माईंनी एव्हाना बाबूजी येतील म्हणत मला घरात घेतले.घरात प्रवेश करताच बाबूजींचा मोठा फोटो दिसला आणि मनोमन नमस्कार केला.पोस्टवर जो फोटो लावला आहे तोच.माईंना माझा परिचय करून देत असताना दिवाणखान्यातल्या चारही भिंतीवरचे रॅक स्मृतीचिन्हांनी गच्च भरलेले पाहून थक्क झालो. तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि माई म्हणाल्या ह...

श्रीरामानुजीय सांप्रदायी विष्णुसहस्रनामभाष्य

Image
श्रीमन्महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनामाचे महात्म्य भक्तांच्या मनांत अधिक दृढ करण्यासाठी आणि परमेश्वराच्या असीम गुणैश्वर्याचे दर्शन घडविण्यासाठी आपआपल्या परंपरेप्रमाणें थोर आचार्यांनी त्यावर भाष्यें केलीं. श्रीमच्छंकराचार्य हें सहस्रनामाचे पहिलें भाष्यकार. त्यानंतर अनेक शतकांनी रामानुजीय सांप्रदायातल्या आलवार संत स्वामी श्रीपराशर भट्ट  यांनी सहस्रनामावर भाष्य लिहिले ते भगवद्गुणदर्पण  या नांवाने ओळखले जाते. श्रीरंगम् येथली श्रीरंगनाथस्वामी म्हणजेच महाविष्णुचे तीर्थस्थान. दक्षिणेतले प्रमुख वैष्णव आचार्य श्रीमद्रामानुजाचार्य यांनी याच क्षेत्री राहून आपला विशिष्टाद्वैती श्रीसांप्रदाय  प्रचारात आणला.नि भगवान् श्रीरंगनाथ वासुदेव हे प्रमुख आराध्य दैवत मानले. या परंपरेतले १२व्या शतकात पराशर भट्ट जन्मले. अल्पायुषी असूनही श्रीरंगनाथाची पराशरांनी केलेंली वाङ्मय सेवा उदंड आहे. अष्टश्लोकी, श्रीरंगराजस्तवन,क्रियादीप, भगवद्गुणदर्पण, गुणरत्नकोष, तिरुमंजन कवि, कैसिकामहात्म्य, इत्यादी संस्कृत आणि तमिळ भाषेत अनेक स्तोत्रे, भाष्ये रचिली. लेखनाचा काहीं भाग कालौघात लुप्त झाला. श्रीरामानुजाच...

माझे देहू दर्शन

Image
                  तुका म्हणे आतां जाली हेचि भेट। उरल्या त्या गोष्टी बोलावया॥ मकरसंक्रांतीला रात्री आळंदीला श्रीज्ञानोबांचे दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी अक्षयबरोबर श्रीतुकोबारायांचे दर्शन घेण्यास देहूला गेलो. खरंतर देहूला जायचे ठरलें नव्हते. पण आले देवाजीच्या मना। तेथे कुणाचे चालेना॥  असेंच झाले. अर्ध्या तासाचं ते अंतर.मग वेळ का दवडता? एक्टिवा घेऊन निघालोच. गप्पा गोष्टी करीत गांवात आलो आणि अक्षय म्हणाला, हं, आलं बरं का देहू.हेच देहू गांव! बास,माझी बोलती एकदम बंद झाली नि मन चारशे वर्ष मागे गेलं.मनच ते ! पुढेतरी जाईल नाहींतर मागे. अगदी प्रभात फिल्म कंपनीच्या संत तुकाराम चित्रपटातलं ब्लॅक ॲन्ड व्हाईट दृष्य डोळ्यासमोर आले.जी भूमी श्रीतुकाराम महाराजांसारख्या परम भगवद्रूपी विभूतीच्या सहवासाने पवित्र झाली ,तिथे माझे पाय लागावें हा देहधर्म असला तरी अंतःकरणात पादस्पर्शं क्षमस्व मे  हा भाव जागृत होता. संस्कृतभाषेनुसार "देहू" या शब्दाची मी फोड अशी केली. पहिले अक्षर "दे" म्हणजे प्रेमाने काळजी घेणें,माया करणें. आणि "हू" याचा अर्थ "आश्चर्याने निघ...

माझी पहिली आळंदी यात्रा

Image
                                          कोण भाग्याचे संतुष्ट। जेथें प्रगटलें वैकुंठ।                               विठ्ठल नामें पूर्ण। आळंकापुरीसी॥     - श्रीनामदेवराय योग्य वेळ आल्याशिवाय काहींही होत नाहीं. आणि जेव्हा तो योग येतो,त्याचा आनंद केवळ अवर्णनीय असतो.त्यातही आपल्या आवडती गोष्ट असली की गगन ठेंगणे होते,असा अनेकांचा अनुभव असणार. असाच अनुभव मला वर्षाच्या सुरुवातीलाच आला. अनेक वर्षांपासून देहू-आळंदी ही दोन तीर्थक्षेत्रं करावीं ही मनीषा होती. असंख्य वेळा पुण्याला जाऊनहीं माझी पाऊलें त्या दिशेने वळली नाहीं हें खरोखरी दुर्दैवच होय. पण हो, कुठल्या गोष्टीची वेळ ठरलेलीं असते.यात माझ्या मनांत शंका नाहीं. यंदाच्या मकरसंक्रांतीचा पर्वकाल.आळंदीचा रस्ता धरला आणि संध्याकाळी इंद्रायणीवरच्या पुलावरून गांवात जाताना हृदय धडधडू लागले! तो घाट,त्यावर अनेक सत्पुरुषांच्या समाधी आणि मागे दिसणारा देवळाचा क...

सतीचे वाण

Image
  संत श्रीतुकाराम महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हाती घेतले ☆ सतीचे वाण ☆ काव्य रचना ही मनुष्यातल्या विशेष प्रसंगी उचंबळून आलेल्या अत्युच्च भावना व्यक्त करण्याचे हृदयस्पर्शी माध्यम आहे.त्यामध्यें शब्दलालित्य आणि कल्पनाविलासाची आवश्यकता कायम ठेवून आत्माविष्कारही पहायला मिळतो.अभिजात काव्यनिर्मितीसाठी जन्मजात प्रतिभेची देणगी निसर्गदत्त असतेच.केवळ शब्दांची ओढाताण, विषयांची सरमिसळ याने त्या वाक्यांना काव्य म्हणता येत नाही आणि दीर्घकाळ टिकतही नाहीं. व्युत्पत्तिः अभ्यासः प्रतिभा इति काव्यहेतुः असें म्हटले आहे. मागे श्रीतुकोबांनी रचलेले श्रीविष्णुसहस्रनामावरचे अभंग अभ्यासित असताना एक अभंग नजरेस चमकून गेला.तो अभंग वाचताना मनात असा विचार आला की, थोर माणसांमध्यें प्रकृतीनुसार भेद असायचेच.पण विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन त्यासाठी आपले सर्वस्व अर्पण करण्यांत ती माणसे मागे पुढें पहात नाहीं.आणि मग समरसता नसली तरी क्वचित एक वाक्यता कुठेतरी आढळते. लोकप्रवाहाच्या विरुद्ध जाऊन कार्य करायचे म्हटले कीं, त्यासाठी अलोट धैर्याची आवश्यकता असते.मग ते काम व्यक्तिकेंद्रित असो वा समष्टीसाठी. ध्येय नि...

विष्णुसहस्रनामाचे पहिले भाष्यकार "श्रीमत् आद्य शंकराचार्य"

Image
   गेयं गीतानामसहस्रं ध्येयं श्रीपतिरूपमजस्रम्।             नेयं सज्जन सङ्गे चित्तं देयं दीनजनाय च वित्तम्॥ (भज गोविन्दम्) आद्य श्रीशंकराचार्यांचे कार्य हे हिमालयासारखे उत्तुंग आणि समुद्राप्रमाणे खोल आहे.जवळपास दोन सहस्र वर्षांचा काल लोटूनही शंकराचार्यांचे कार्य, तत्त्वज्ञान नि वाङ्मय आताच्या डिजीटल युगापर्यंत येऊन तितकेच सतेज राहिले आणि पुढेही रहाणार.याची कारणमीमांसा करायची झाली तर श्रीसमर्थांचे वचनच उद्धृत करावे लागेल- सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे। परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे॥ वैदिक धर्माची पुनर्बांधणी,हिंदु सांप्रदायिकांचे एकत्रीकरण, नास्तिकमताचे पारिपत्य इत्यादी अनेक कार्यासाठी शंकराचार्यांचा अवतार झाला. श्रीशंकराचार्यांचे ब्रह्मसूत्र,उपनिषदे आणि भगवद्गीता या प्रथानत्रयींवरील भाष्यग्रंथ हे उत्तमाधिकारी साधकांसाठी आहेत.याचे कारण असें कीं त्यांतलें विषय आणि तत्त्वज्ञान इतके उच्च स्थरावरचे आहेत त्यासाठी पूर्वाभ्यास अवश्यक लागते.नाहींतर त्याचे आकलन होणे अवघड. याशिवाय मध्यमाधिकारी मुमुक्षूंसाठी प्रकरणग्रंथ . त्यामध्यें म...