महाभारतांतर्गत श्रीविष्णुसहस्रनाम
वैदिक सनातनधर्माचें तत्वज्ञान व नीतिमूल्यांचे सार असलेला ग्रंथ श्रीमद्भगवद्गीता आणि भगवंताच्या असीम गुणैश्वर्याचा समुचय श्रीविष्णुसहस्रनाम या स्तोत्रात प्रकट झालेला आहे.श्रीशंकराचार्यां पासून सगळ्यांनी या दोन्हीचे माहात्म्य शिरोधार्य मानले तथा वृद्धींगत होत गेले. आचार्यांनी गेयं गीता नामासहस्रं अशी त्याची महती आपल्या चर्पटपञ्जरिकेत आवर्जून नमूद केलीं आहे. गेयं म्हणजे गाण्याजोग अर्थात समस्त मानवजातीला सुगमतेने पारमार्थिक उन्नती भगवद्गीता आणि सहस्रनामाच्या आश्रयाने करता येईल. महाभारताच्या अनुशासन पर्वात पितामह भीष्मांनी धर्मराज युधिष्ठिरास हे दिव्य सहस्रनाम सांगितला आणि ते सांगत असताना प्रत्यक्ष भगवान् श्रीकृष्णाचा त्यास अनुमोदन होते.हा या सहस्रनामाला एका प्रकारे आशीर्वादच म्हणावा लागेल. त्याची थोडक्यात कथा अशी आहे - भरती युद्धानंतर श्रीकृष्ण भीष्म पितामहांकडे येऊन त्यांनी पांडवांना उपदेश करण्याविषयीं सांगतो. परंतु भीष्म वासुदेवास म्हणतात की,"स्वतः भगवंत आपण असताना मी काय उपदेश द्यावा?" तथापि भगवंतांनी भीष्मांनाच उपदेश करण्याची विनंती केलीं. अष्टसात्विक तेज गं...