Posts

Showing posts from March, 2022

धन्य ते संसारी। दयावंत जे अंतरीं॥

Image
  "शांतिजलधि संत श्रीएकनाथ महाराज समाधी दिवस" "नाथषष्ठी"  श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी उपरांत काहीं काळात उत्तरेकडून मुसलमानी आक्रमकांचे तांडे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात आदळून बहमानी, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही वगैरे इस्लामी राज्ये धुडघूस घालू लागली.तलवारीच्या जोरावर हिंदूंवर चोहोबाजुंनी हल्ले चढवून क्रूरतेच्या टाचेखाली तूडवू लागली.देवालयांच्या धडाधड मशिदी होऊ लागल्या, शेती-वाड्यांची जाळपोळ, बायकां-मुलांवर अत्याचार, करत्या पुरुषांच्या कत्तली, बाटवाबाटवी, एकना अनेक अनन्वित छळ हा महाराष्ट्र नि देश सोसत होता. त्या कालखंडात गोदावरीकाठी प्रतिष्ठान नामक संपन्न नगरीत शके १४५० इ.स.१५३२ च्या सुमारास श्रीभानुदासांचा नातू श्रीसुर्यनारायण नि त्यांच्या पत्नीस रुक्मिणीच्या पोटी श्रीएकनाथ  जन्मले. प्रतिष्ठान नगरी म्हणजेच पैठण.शककर्ता शालिवाहन अर्थात सातवाहनाची ही राजधानी. या नगरीचे वैभव ओळखून तीस दक्षिण काशी   म्हणून गौरविले जाई.सत्त्वशील ब्राह्मण संत घराण्यात नि संपन्न नगरीत जन्मलेले श्रीएकनाथ महाराजांची मूळची वृत्ती भगवद्भक्तमय असल्याने तीचे पोषणही त्याच प्रकारें ...

श्रीशिवछत्रपती जयंती

Image
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ति । काय सांगणे तुम्हांप्रती। परी धर्मस्थापनेची कीर्ति । सांभाळली पाहीजे॥                                                -समर्थ रामदास. हिंदूंमध्यें अलौकिक कार्य करणाऱ्यांना दैवी अवतार मानण्याची सात्विक प्रवृत्ती अगदी प्राचीन आहे.त्यात हिंदूंच्या निर्मल मानसिकतेचे दर्शन होतें. सनातन धर्माची मरगळ दूर सारून त्यास पुनः चैतन्य प्रदान करण्याचे "या सम हाच" या न्यायानें कुठल्या दोन विभूतींनी महत कार्य केलें असेल तर तें पूज्य   भगवद्पाद श्रीमदाद्यशंकराचार्य आणि छत्रपती श्रीशिवाजी महाराज होय. तत्त्वज्ञानाच्या आणि तलवारीच्या जोरावर भारतावर शेकडो आक्रमणें झाली नि अजूनही होत आहेत.तथापि या तडयाखातून आपले 'सनातन' अस्तित्व हिंदू धर्माने टिकवलें आहे, जपले आहे.याचें श्रेय निःसंशय अडीच सहस्रवर्ष मागे जन्मलेलें श्रीशंकराचार्य आणि शके १५५१ मध्यें महाराष्ट्रांत जन्मलेलें श्रीशिवराय यांनाच जाते. हिंदूंचे गाढ झोपी गेलेलं स्वत्व या दोन महापुरुषांनी जागृत केलें हा स...

श्रीतुकोबारायांचे विष्णुसहस्रनाम चिंतन

Image
      नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरींचीं ॥      वारकरी सांप्रदाय हा महाराष्ट्रातल्या भागवतधर्माचे एक अनुपम रूप होय. याची प्राचीनता श्रीज्ञानोबारायांच्याही मागे जाते.वारकऱ्यांचे मुख्य दैवत पंढरपूरस्थित श्रीविठ्ठल आणि सांप्रदायाचे अग्र उपासना साधन हें नामस्मरण होय.कलियुगांत परमेश्वरप्राप्तीसाठीं नामस्मरणासारखें अन्य प्रभावी साधन नाहीं हें सकलसंतमंडळींनीं अनुभवांती एकमतानें सांगितलेले आहे. भगवद्गीतेत स्वयं भगवान् याची ग्वाही देत म्हणतात - यज्ञानां जपयज्ञोऽस्मि (१०:२५) यज्ञामध्यें जप अर्थात नामस्मरण हें अध्यात्मातलें उच्चतम साधन आहे. हरिपाठाचे अभंग हेही वारकऱ्यांच्या नित्य उपासनेतील एक महत्त्वाचा भाग.ते अभंग पहिल्यावर लक्षात येईल कीं त्याचा मुख्य विषय नामसंकीर्तन हाच आहे. लोकांना योगयागादी न झेपणारी साधनेपेक्षा नामसंकीर्तनाचा सोपा मार्ग दृष्टीस आणुन दिला. महाभारतातल्या अनुशासन पर्वात येणा ऱ्या श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र हे वैष्णवांचे आवडते स्तोत्र.या लेखामध्यें श्रीतुकोबारायांनी सहस्रनामाचे अभ्यासांती केलेंल्या अभंगांचा उहापोह करणार ...

जियें मार्गींचा कापाडी। महेशु आझुनी॥

Image
      🕉 महाशिवरात्र  🕉 आपल्या महान् हिंदुधर्म संस्कृतीमध्यें काहीं अपवाद वगळता बहुतांशी सण, उत्सव, व्रतादींची सुरुवात सूर्योदयापसून होते.भगवान् श्रीकृष्णाचा अवतारच मुळी मध्यरात्री झाल्यानें देवाचा जन्मोत्सव त्याचवेळी करण्यास दुसरा प्रत्यवाय नाहीं.परंतु शैव आणि शाक्त परंपरेत साधनेसाठी रात्रीचा काल प्रशस्त मानला आहे.दिवाळीसारख्या सणाला दिव्यांचे महत्त्व असल्याने संध्याकाळी व्रतानुसार संध्याकाळी पुजा होते.पण अशी उदाहरणे मोजकीच.तथापि उपासनेच्या दृष्टीने प्रदोषकाळी केल्या जाणाऱ्या शिवाराधनेला नि अश्विन नवरात्रोत्सवाची महती त्या त्या सांप्रदायांत अनन्यसाधारण आहे. नवरात्रांमध्यें रात्री जागरण करून देवीची आराधना करणे हे उपवासाबरोबरचे महत्त्वाचे अंग.तिच कथा माघातल्या  महाशिवरात्र या व्रताची. मी जाणीवपूर्वक "व्रत" असा उल्लेख करीत आहे.कारण काहीं व्रतांची हल्ली सरसकट उत्सवात गणती केलीं जाते ती अगदी अयोग होय. महाशिवरात्रीच्या व्रताचा प्रारंभ त्रयोदशीस एकभुक्त राहून होतो.चतुर्दशीला संकल्पादी करून संध्याकाळी व्रताची प्रथम पुजा केली जाते.नि रात्रीच्या चारही प्रहरात भगवान्...